Posts

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

Image
 करताय ना महाराष्ट्र दिन साजरा ? खूप आनंदोत्सव असेल तुमच्याकडे. संस्कृतीचा जल्लोष असेलच की ? आणि हो विसरलोच हुतात्मा स्मारकावर जाऊन नमन केला की नाही ? आठवणीने करा बर का. जमलच थोडा वेळ तर त्या स्मारकाच्या बाजूला असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाखाली काही नावे कोरली आहेत ती सुद्धा वाचा.. जास्त वेळ नाही लागणार हो. या महाराष्ट्रासाठी त्या लोकांनी जीव अर्पण केला आहे आपला. निदान त्यांची नावे मुखात एकदा तरी येतील. नाही तर रोज रडणाऱ्या तुम्हा आम्हाला त्या लोकांचं बलिदान वेदना देईल अस वाटत नाही मला. कारण आपण अश्या काळात आलोय जिथे बलिदान म्हणजे एक दिवस फुले वाहण्याचा कार्यक्रम झालाय. त्या मागचा त्याग, दुःख, अन्याय याचा काही एक परिणाम आपल्यावर होत नाही. आता देखील माझा हा लेख वाचताना अनेकांच्या मनात सहज आल असेल की या गोष्टी लिहायला बऱ्या आहेत. आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला माहिती वगैरे वगैरे. पण लेखकाची लेखणी तेव्हाच उमटते जेव्हा त्याच्या काळजाला वेदना झालेल्या असतात. हा काय मोठा लेखक म्हणणाऱ्या लोकांना देखील माझी काय हरकत नाही हो. मराठी माणसाचा स्वभावच आहे तो , आपल्याला दुसऱ्याच कौतुक क

सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची बेअब्रू करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय पक्ष्यांचे कारस्थान.

Image
देशात भाषावार प्रांतरचना होण्या आधीपासून महाराष्ट्र एकीकरण समिती अस्तित्वात आहे. देशात राज्य निर्मिती करताना जे जे आयोग  नेमले गेले त्या सगळ्या आयोगाना  समितीने आपले निवेदन विस्तृत स्वरूपात दिले आहे. आमची मागणी कर्नाटकाच्या  निर्मिती आधी पासून आहे हे लक्ष्यात घ्यावं  सातत्याने मराठी  माणसाला कन्नड विरोधी दाखवून  त्यांना दोषी सिद्ध करण्याचे नीच कृत्य राजकीय पक्ष करताना दिसतात. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वामध्ये सुरु असणारा बेळगाव सह वादग्रस्त मराठी बहुल सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याचा लढा हा केंद्र सरकारच्या विरुद्ध आहे. जस कन्नड लोकांना त्यांचे राज्य प्रिय आहे तसे आम्हाला आमचा महाराष्ट्र प्रिय आहे.  नेहमी मराठी  लोकांना ऐकवले जाते कि कर्नाटकात राहता, इथलेच खाता वगेरे , अरे आम्ही आमच्याच राज्याचं खात होतो. आमच्याच राज्यात राहत होतो. हा मुंबई प्रांत होता. भाषावार प्रांत रचनेत हा भाग मराठी आहे हे सुद्धा मान्य केलाय कर्नाटक राज्याला कमी पडलं म्हणून कोणताही भक्कम आधार नसताना राजकीय स्वार्थासाठी आमचा बळी गेला. कर्नाटक राज्य कसे तयार झाले याचा कधीतरी अभ्यास करा समजेल कि बेळगावचे लो

चोर सोडून संन्याशाला त्रास - कर्नाटक शासनाचा अजब कारभार

Image
                         बंगलोर येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या कारणामुळे बेळगाव मध्ये तणाव निर्माण झाला होता. बेळगावच्या धर्मवीर संभाजी  महाराज चौकात मराठी भाषिकांनी आपला रोष व्यक्त करत शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या लोकांना त्वरित अटक करून कडक शासन करावे अशी मागणी केली. यावेळी काही समाज कंटकांनी मराठी भाषिकांना या घटनेत गोवण्यासाठी संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना केली व सदर घटना मराठी भाषिकांनी सूड घेण्यासाठी केल्याचा आरोप करत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव मध्ये सुरु असणाऱ्या कर्नाटकाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला खुश करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ज्या मराठी लोकांनी न्याय देण्याची मागणी केली त्यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलन करणाऱ्या मराठी लोकांनी पोलिसांवर दगडफेक करत खून करण्याचा प्रयत्न  केला असा ठपका ठेवत  ३०७ कलम सारखें  गंभीर गुन्हा दाखल  केले  आहेत. अश्या खोट्या गुन्ह्यांमुळे सीमाभागात आणखीन  संताप पसरला आहे. बेळगाव शहरात या घटनेनंतर १४४ कलम लागू केला आहे . सदर जमावबंदीचा आदेश बुधवारी दि २

Need Justice to the Farmers, who are Suffering because of Halga- Macche Bypass land aquicision at Belgaum

Image
  Currently, the burning issue in the Belgaum area is the ongoing farmers' agitation for the cancellation of the Halga-Machche bypass. This struggle of the farmers is not of today but for many years the voice of Halga-Machche bypass has been raised. But in the last few days, it has intensified and the cause is just as important. The main reason for the agitation is the use of force by the police in Belgaum for the construction of the Halga-Machche bypass road. Trying to grab land by force despite strong opposition from farmers is tantamount to intrusion. The National Highways Authority has set up National Highway no.4 Preparations started for Halga-Machche bypass road connecting National Highway No. 4A from Belgaum to Goa. But farmers have been opposed to the project since its inception. Even bullock carts, tractors, animals were taken out for the protest. Statements were made to the Collector several times. Even when Union Minister Nitin Gadkari laid the foundation stone of the p

मराठीच्या पाऊलखुणा :- केरळ-कर्नाटकच्या सीमेवरील कासारगोड येथील मराठी लोक

Image
                                                         (फोटो सौजन्य :- KIRTADS)                                  मराठी भाषा , मराठी संस्कृती याचा अभ्यास करेल तेवढा कमी .मुळात हि भाषा आणि संस्कृती इतकी प्रगल्भ इतकी पुरातन आणि खोलवर रुजलेली आहे कि तिचा तळ कदाचित अजून कुणी गाठला असेल. जस समुद्राच्या तळापर्यंत माणूस पोहचू शकला नाही तसचं मराठी भाषेचा तळ आम्ही अजून गाठू शकलो नाही. दूरवर पसरलेली भाषा हि या आगद मराठी साम्राज्याची साक्ष देते. मराठी हि जागतिक भाषा आहे आणि जागतिक व्यवहार करण्याचे सामर्थ्य मराठीत आहे. पण मराठी लोकांच्याच असंवेदनशिलतेमुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे आज पुन्हा पुन्हा मराठीचे सामर्थ्य जगाला ओरडून सांगायची गरज वाटत आहे. अगदी काल- परवा मुंबई हि हिंदी म्हणून प्रचार करणाऱ्या लोकांच्या कानात हे जळते तेल घालून सांगायची गरज आहे कि मुंबई पुरतेच नाही तर मराठीचे साम्राज्य हे भारतातील कोणत्याही इतर भाषेपेक्ष्या मोठे आहे. आणि त्यासाठीच या विशाल पसरलेल्या मराठी भाषेचा आणखीन एक भाग किंवा पैलू म्हणजे केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या कासारगोड येथील मराठी लोक . जे शेकडो वर्

मराठी भाषा दिन निमित्त "मराठीची निर्भया" हि कविता

Image

सीमाभागात आणखीन एक अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला

Image
सीमाभागातील मराठी लोकांची व्यथा आणि समस्या या देशाला किंबहुना महाराष्ट्रातील सत्ताधार्यांना (कोणत्याही पक्ष्याचे असो) कधी कळणार नाही हेच खरे. खूप उद्विग्नतेतून आजचा हा लेख प्रपंच तुमच्या समोर मांडतोय.घटनाच अशी समोर घडली कि न आवाज न पुरावा मागे सोडत पुन्हा एकदा एक विचारांचा बळी घेतला कर्नाटक सरकारच्या व्यवस्थेने. सकृत दर्शनी अलगद वाटणारा विषय किती खोलवर परिणाम करतो याचे वास्तव तुमच्या समोर मांडणार आहे. सीमाभागातील अन्याय कोणत्या स्वरूपाचे आहेत. त्याची बांधणी किती खोलवर इथल्या व्यवस्थे मध्ये झाली आहे याचे हे जिवंत उदाहरण. बेळगाव शहराला लागून असणारे गाव. घटनेची सुरवात २०१६ मध्ये झाली. युवकाच्या घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरु आहे. हा युवक सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी युवकांसाठी गावपातळीवर अग्रेसर होता. त्यामुळे विघ्नसंतोषी लोकांना आपसूक नजरेत खटकणार. लग्नाच्या पत्रिका वाटण्याची गडबड सुरु असताना एक दिवस सकाळी घरासमोर पोलीस येवून थांबले. अवघ्या काही दिवसांवर लग्न , घरात नातेवाईक, गावातील जाणते नाव अश्यात अचानक पोलीस घरासमोर थांबल्यावर सगळेच बिथरले. कारण स