महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..
 करताय ना महाराष्ट्र दिन साजरा ? खूप आनंदोत्सव असेल तुमच्याकडे. संस्कृतीचा जल्लोष असेलच की ? आणि हो विसरलोच हुतात्मा स्मारकावर जाऊन नमन केला की नाही ? आठवणीने करा बर का. जमलच थोडा वेळ तर त्या स्मारकाच्या बाजूला असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाखाली काही नावे कोरली आहेत ती सुद्धा वाचा.. जास्त वेळ नाही लागणार हो. या महाराष्ट्रासाठी त्या लोकांनी जीव अर्पण केला आहे आपला. निदान त्यांची नावे मुखात एकदा तरी येतील. नाही तर रोज रडणाऱ्या तुम्हा आम्हाला त्या लोकांचं बलिदान वेदना देईल अस वाटत नाही मला. कारण आपण अश्या काळात आलोय जिथे बलिदान म्हणजे एक दिवस फुले वाहण्याचा कार्यक्रम झालाय. त्या मागचा त्याग, दुःख, अन्याय याचा काही एक परिणाम आपल्यावर होत नाही. आता देखील माझा हा लेख वाचताना अनेकांच्या मनात सहज आल असेल की या गोष्टी लिहायला बऱ्या आहेत. आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला माहिती वगैरे वगैरे. पण लेखकाची लेखणी तेव्हाच उमटते जेव्हा त्याच्या काळजाला वेदना झालेल्या असतात. हा काय मोठा लेखक म्हणणाऱ्या लोकांना देखील माझी काय हरकत नाही हो. मराठी माणसाचा स्वभावच आहे तो , आपल्याला दुसऱ्याच कौतुक क